मलिक देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच, सोमय्यांनी ट्विट करत मविआला डिवचलं
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. मात्र, या याचिकेवर पुढील चार आठवड्यांपर्यंत सुनावणी सुरु ठेवली जाईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळालेली नाही. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना आता विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता येणार नाही हे स्पष्ट झालं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तातडीनं ट्विट करत महाविकस आघाडीवर टीका केली आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरु राहणारअनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना तातडीनं दिलासा देण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टात यापुढे या प्रकरणी सुनावणी सुरु ठेवण्याचे संकेत दिले आहेत. सुप्रीम कोर्टानं अंतिम आदेश दिला नसल्यानं नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची याचिका इतर तुरुंगात असलेल्या लोकप्रतिनिधींच्या मतदानासाठी निर्णायक ठरु शकतो. किरीट सोमय्यांचं तातडीनं ट्विटसुप्रीम कोर्टानं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या याचिकेवर तातडीनं दिलासा देण्यास नकार दिला आहे.