breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

महाविकास आघाडीला उघडं पाडून गाडल्याशिवाय राहणार नाही : सदाभाऊ खोत

सांगली : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे आपल्या रांगड्या स्वभावासाठी आणि भाषणाच्या हटके स्टाइलसाठी ओळखले जातात. सांगली येथे मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमातही सदाभाऊ खोत यांचं हेच रूप पाहायला मिळालं. खोत यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीक करत असताना चौफेर फटकेबाजी केली.

‘मी आणि गोपीचंद पडळकर पागल माणसं आहोत. क्रांती करायला पागल माणसं लागतात. शहाणी माणसं क्रांती करत नाहीत. शहाणे लोक अभ्यास करतात आणि तत्वज्ञान शिकवतात. त्यामुळे आम्हा दोघा पागल माणसांना राज्यात क्रांती करायची आहे आणि हे सरकार उलधवायचं आहे,’ असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
हर्बल तंबाखूच्या शेतीला परवानगी देण्याची मागणी
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे. शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. पूर्वमोसमी पावसामुळे द्राक्ष बागा झोपल्या आहेत. कांदा उत्पादकांची वाट लागली आहे. मात्र सरकारची मदत मिळत नाही. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना हर्बल तंबाखूचा पेरा करण्याची परवानगी द्यावी. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आम्ही सरकारकडे शेतकऱ्यांना हर्बल तंबाखूचे बियाणं देण्याची मागणी करणार आहोत,’ असं खोत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमच्या शेतकरी जागर आक्रोश मोर्चानंतर विरोधक अस्वस्थ झाले असून माझी २०१४ मधील खोटी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात येत आहे. मात्र आम्ही सरकारला उघडे पाडून गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button