breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Lockdown: ३९ लाख तिकिटे रद्द होणार
टाळेबंदीमुळे प्रवासी रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्यामुळे, १५ एप्रिल ते ३ मे या कालावधीतील काढण्यात आलेली सुमारे ३९ लाख तिकिटे रेल्वेला रद्द करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १४ एप्रिलनंतरच्या प्रवासाकरिता तिकिटे बुक करण्याची परवानगी रेल्वेने दिल्यानंतर, टाळेबंदीनंतर गाडय़ा सुरू होतील या आशेने प्रवाशांनी सुमारे ३९ लाख तिकिटे काढली होती. टाळेबंदीचा कालावधी वाढविल्याने रेल्वेने मंगळवारी केवळ ३ मेपर्यंतच्या प्रवासी सेवाच रद्द केल्या नाहीत, तर सर्व आगाऊ बुकिंगही थांबवले.