breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Lockdown: फक्त ४ रेल्वेंचा ७२ तास प्रवास
श्रमिक रेल्वेंना ठरलेल्या स्थानकांवर पोहोचण्यासाठी कित्येक तासांचा उशीर होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. या टिकेला उत्तर देण्यासाठी रेल्वेमंडळाने शुक्रवारी पत्रकार परिषदही घेतली. रेल्वेने आत्तापर्यंत ३८४९ श्रमिक रेल्वे सोडल्या, त्यापैकी फक्त ४ रेल्वेंना गंतव्य स्थानकावर पोहोचण्यासाठी ७२ तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. कोणतीही रेल्वे मार्गापासून भरकटली नाही, असा दावा केंद्रीय रेल्वेमंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी केला. रेल्वेगाडीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रमिक रेल्वेगाडी सोडली जाईल, असेही यादव यांनी सांगितले. एकूण स्थलातंरित मजूर प्रवाशांपैकी ४२ टक्के प्रवासी उत्तर प्रदेश तर ३७ टक्के प्रवासी बिहारला परतले आहेत.