शाळा महाविद्यालयांबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेऊ; आदित्य ठाकरेंची माहिती
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात ओमिक्रोन बरोबरच कोरोनाचाही संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने याबाबत परिस्थिती पाहून सरकार लवकरच महत्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्यावेळी आदित्य ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले कि सध्याची स्थिती फारशी गंभीर नसली तरी कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी. गर्दी टाळणे आणि मास्कचा वापर अनिवार्य आहे. सध्या नाताळ निमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्टी आहे. मात्र पुढील काळात शाळा महाविद्यालये सुरु ठेवायची कि नाहीत याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले कि काही मुलांनी दोन वर्षात शाळा पाहिलेलीच नाही, अशी स्थिती आहे. याचे आपल्याला निश्चितच दुख आहे. पण आरोग्य हि आपली प्रार्थमिक गरज असल्याने काही निर्णय घ्यावे लागतात.हा आठवढा गेल्यावर परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा महाविद्यालय बाबत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान शिक्षण विभागाचेही बदलत्या परिस्थितीवर लक्ष आहे. तर रविवारी एकाच दिवशी मुंबईत ओमिक्रोनचे २७ तर कोरोनाचे ९२२ रुग्ण सापडल्याने पालकांची आणि शाळा प्रशासनाची सुधा चिंता वाढली आहे. मात्र सरकार पुढील आठवड्यात कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.