ताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘पाकव्याप्त काश्मीर’ वर ताबा ठोकण्याची तयारी !

मोदी यांच्याशी चर्चा करून अमित शहा श्रीनगरमध्ये : दहशतवाद्यांचे 'डेथ वॉरंट' तयार !

  • पहेलगाममध्ये हिंदूंच्या मृतदेहांचा खच : हिंदू का? म्हणून विचारले आणि धाड धाड गोळ्या घातल्या !

श्रीनगर : पहलगामजवळ बैसरण खोऱ्यामध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी मंगळवारी दुपारी बेछूट गोळीबार केला. पर्यटकांमधील हिंदूंना बाजूला काढून दहशतवाद्यांनी त्यांना अचूक टिपले. या नरसंहारात किमान २७ पर्यटक ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून गृहमंत्री अमित शहा यांच्याशी ते सतत संपर्कात आहेत. रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ, हिशेब चुकता करू, असे मोदी म्हणाले.

सीमेवर प्रचंड तणाव, भारताने कुमक वाढवली..

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए- तोयबा’ ने ही जबाबदारी स्वीकारली आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याशिवाय पर्याय नाही, हीच भारताची भूमिका असून देशातील नागरिकांना विश्वासात घेण्यासाठी येत्या दोन दिवसात पाकिस्तानवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. कदाचित, भारताचे सुरक्षा दल हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथे ताबा ठोकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.

अमित शहा ‘ॲक्शन मोड’ मध्ये

अमित शहा आणि लेफ्टनंट जनरल मनोज सिन्हा हे श्रीनगरला पोहोचले असून तेथून ते संपूर्ण ऑपरेशन हाताळत आहेत. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद्यांना सोडणार नाही, असा इशारा सुरक्षा दलांनी दिला आहे.

दुपारी अडीचच्या सुमारास भ्याड हल्ला..

काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या दहशतवादी हल्यामध्ये एकूण २७ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी आहेत. दहशतवाद्यांनी पुण्यातील पर्यटकांची नावे विचारली आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्याची माहिती समोर येत आहे.

दहशतवादी पाकचे : मुख्य ‘टार्गेट’ नरेंद्र मोदी!

या दहशतवाद्यांच्या बोलण्याचा सूर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होता. त्यांच्या प्रत्येक वाक्यातून मोदीद्वेष स्पष्ट जाणवत होता. मोदींना तुम्ही भारतीयांनी डोक्यावर बसवून ठेवले आहे. त्यामुळे आम्हाला जास्त त्रास होतो आणि त्याचा बदला आम्ही घेणार आहोत, असे हे दहशतवादी बोलत होते.

हेही वाचा –  PCMC: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण

पाकिस्तानवर कठोर कारवाई?

या भ्याड हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने घेतली असल्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर काहीतरी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. विशेषतः, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेली दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त करण्यासाठी तेथे लष्कर घुसवण्यात येण्याची शक्यता असून त्यानिमित्ताने त्या भूभागावर आता ताबा ठोकण्याचीही संधी असल्याचे काही विश्लेषकांनी आणि संरक्षणतज्ज्ञानीम्हटले आहे.

सर्व प्रमुख नेते एकमेकांच्या संपर्कात

भारताच्या सुरक्षा दलाशी मोदी, शहा यांच्या व्यतिरिक्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा दलाचे प्रमुख अजित डोवल हे संपर्कात असून त्यांची या हल्ल्यानंतर अनेक वेळा महत्त्वाची बोलणी देखील झाली आहेत. पुढील कारवाईबाबत आखणी देखील झाली आहे. काश्मीर खोऱ्यातील ३७० वे कलम हटवल्यानंतर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया..

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

पुण्यातील जगदाळे आणि गनबोटे कुटुंबीय..!

पुण्यातील जगदाळे पती-पत्नी आणि त्यांची मुलगी तसेच गनबोटे पती-पत्नी हे पर्यटनासाठी दोन दिवसांपूर्वी काश्मीरला गेले होते. हे सर्व पुण्यातील कर्वेनगर येथील रहिवासी असल्याचे बोलले जाते. त्यातील पुरुषांवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. माणिक पाटील आणि एस. भालचंद्र अशी महाराष्ट्रातील अन्य दोघांची नावे समोर आली आहेत. पहलगाम येथे झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए- तोयबा तसेच टी.आर.एफ. या दहशतवादी संघटनांनी स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसेच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या, अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे. पहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे पुणेकर नागरिक काश्मिरी पोषाख घालून फोटो काढत होते. त्यावेळी त्यांच्यासमोर अचानक दहशतवादी आले. या पर्यटकांना दहशतवाद्यांनी नावे विचारली. नावांवरुन त्यांचा धर्म लक्षात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काहीतरी विपरीत वक्तव्ये करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एकाला तीन गोळ्या लागल्या असून या व्यक्तीची परिस्थिती चिंताजनक आहे. तर दुसरा पुरुषदेखील गंभीर जखमी आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button