ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

‘ऑपरेशन सिंदूर’ Controlled by नरेंद्र मोदीजी !

भारताच्या कुरापती काढायच्या नसतात..भारताच्या नादी लागायचं नसतं, हे ‘ऑपरेशन सिंदूर’ वरून पाकळ्यांना नक्की समजलं असणार ! पण, नाक तुटलं तरी भोकं कायम, ही त्यांची मनोवृत्ती असल्यामुळं ते यापुढंही कुरापती काढणार, आणि भारताकडून सपाटून मार खाणार..थोबाड फोडून घेणार !

भारताची मोहीम फत्ते..

भारतीय सेनेनं अखेर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी ‘एअर स्ट्राईक’ करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला..भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं होतं.

‘ऑपरेशन सिंदूर’ च का?

पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना वेचून वेचून मारले. महिलांना हातसुद्धा लावला नाही. तरुण युवकांना टिपल्यामुळं एक प्रकारची दहशत निर्माण झाली. पण, पुरुष मारले गेल्यामुळं अनेक नवविवाहित महिलांचं कुंकू पुसलं गेलं. त्या कुंकवाचा बदला म्हणून मोदी सरकारनं ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतलं आणि यशस्वीरीत्या पार पाडलं ! मुख्य गोष्ट अशी की स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या संपूर्ण ऑपरेशन वर आपली पकड मजबूत ठेवली होती.. संपूर्ण नियंत्रण त्यांचेच होते, म्हणा ना!

दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त..

भारतीय वायुदलाकडून जैश- ए- महम्मद, हिजबुल मुज्जाहिद्दीन आणि लश्कर-ए- तोयबाचे तळ उद्धवस्त.. मध्यरात्री दीड वाजता कारवाई.. दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटरही उद्ध्वस्त करण्यात आले, अशा बातम्या विविध समाज माध्यमांवरून रात्री झळकू लागल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणावर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पस चं अचूक लक्ष्य साधलं. ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश-ए- महम्मदचं धडकी भरवणारा प्रचंड मोठं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.

मोदी हेच ‘ऑपरेशन मॉनिटर!’

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून, भारताच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. भारताने आपल्या हद्दीत राहून हे हवाई हल्ले केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तथापि, काही हल्ले पाकिस्तानच्या सुमारे १०० किलोमीटर आत करण्यात आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॅानिटर करत होते. नऊ टार्गेट ठेवण्यात आले होते. नऊ च्या नऊ टार्गेट यशस्वी झाले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पचं अचूक लक्ष्य साधलं, हे एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल!

हेही वाचा –  एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही लवकरच कार्यान्वित, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेची अपेक्षा..

भारतानं जम्मू – काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून घेतला आहे. यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये भारताचे एअरस्ट्राईक ‘इट इज शेम’ अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. दोन्ही देशांनी तणाव कमी करावा, असा आग्रह वजा सूचना त्यांनी केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी याबाबत ऐकलेय, इट इज शेम, अपेक्षा आहे की हे लवकर समाप्त होईल. कोणत्याही दोन बलवान देशांना युद्धाच्या मार्गावर जाताना पाहू शकत नाही. या दोन्ही देशांचा इतिहास जुना असून तणाव वाढलेला आहे. मात्र, जगाला युद्ध नकोय शांतता पाहिजे, असं ट्रम्प म्हणाले. हे लवकर संपेल अशी आशा बाळगतोय, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

अमेरिकेला क्षणोक्षणी माहिती..

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वर अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते म्हणाले, की आम्हाला याबाबत माहिती आहे. आम्ही सध्या अधिक भाष्य करणार नाही. सर्व घटनांवर नजर ठेवून आहोत. वॉशिंग्टनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार भारतानं एअरस्ट्राईक केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या एनएसए आणि विदेश मंत्री मार्को रुबियो यांना फोनवरुन माहिती दिली आहे, असेही सांगण्यात आले.

पाकिस्तान गारठलं..

पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी भारतानं मुजफ्फराबाद, कोटली, बहावलपूरमध्ये हल्ले केल्याच्या घटनेला पुष्टी दिली आहे. भारताचं कोणतंही विमान किंवा जेट पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये आलं नव्हतं, असं त्यांनी म्हटलंय. पाकिस्तानमध्ये लाहोर आणि सियालकोट विमानतळं पुढील दोन दिवस बंद करण्यात आली आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. तर, १७ जण जखमी झाले होते. पहलगाम दहशतवादी हल्ला २२ एप्रिलला झाला होता. भारतानं या हल्ल्याचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे घटनेच्या तेराव्या दिवशी घेतला आहे.

दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले !

दरम्यान, पाकिस्तानी माध्यम संस्थांच्या म्हणण्यानुसार भारतीय सैन्यानं ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत बहावलपूरमध्ये जामा मशीद सुभान अल्लाहवर देखील एअर स्ट्राईक केला आहे. ही मशीद जैश-ए- महम्मदची हेडक्वार्टर आहे. पाकिस्तानच्या कोटलीमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचं प्रशिक्षण केंद्र आहे. मुजफ्फराबादमध्ये लष्कर-ए- तोयबाचं ट्रेनिंग सेंटर आहे. तर, हिजबुल मुजाहिद्दीनचं हेडक्वार्टर आहे. ही ठिकाणं हाफिज सईद आणि मसूद अजहरचे अड्डे आहेत, हे लक्षात घ्यायला हवे !

शेकडो दहशतवादी ठार..

भारताच्या या कारवाईमध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले, याचा अंदाज येऊ शकलेला नाही. पण प्रत्येक ठिकाणी किमान ९० ते १०० दहशतवादी प्रशिक्षणासाठी मुक्कामाला होते, हे स्पष्ट दिसते. जैश-ए-महम्मद चा म्होरक्या मसूद अजहर याच्या कुटुंबातील १४ सदस्य या कारवाईत ठार झाले आहेत. त्यात त्याचा मुलगा, बहीण यांचाही समावेश आहे. कदाचित, तो यापुढे जास्त पिसाळून हिंसाचार घडवून आणू शकेल, पण त्याची कल्पना भारताच्या दिग्गजांच्याकडे नक्की असणार. पाहू या.. ही कारवाई म्हणजे फक्त शितावरून भाताची परीक्षा आहे.. खऱ्या कारवाया नंतरच होणार आहेत, हे पाकड्यांच्याही लक्षात आहे !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button