breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई
Journalist Arnab Goswami arrested । नाईक कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहीजे, पण त्यावेळी शिवसेना सत्तेत नव्हती का? : आमदार नितेश राणे
मुंबई । प्रतिनिधी
रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि विरोधी पक्ष भाजपाच्या नेत्यांकडून आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. राणे यांनी म्हटले आहे की, नाईक कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे यात शंका नाही. पण, २०१४ पासून सेना सरकारमध्ये नव्हती का? त्यांचे गृहराज्यमंत्रीही होतेच. त्यानंतर सेनेच्या कोणत्याही एका आमदाराने विधानसभेत न्यायासाठी प्रश्न विचारला नाही? जर सुशांत आणि दिशा मृत्यू झाला नसता. तर आजचा तमाशा कधीच झाला नसता, असा दुजोराही नितेश राणे यांनी दिला आहे.