JioMart आणि Fecebook मिळून भारतातील किराणा दुकाने सक्षम करणार : मुकेश अंबानी
मुंबई | अमेरिकेतील सोशल मीडिया कंपनी फेसबुक ने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओसोबत मोठा करार केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या डिजिटल ऑपरेशनने रिलायन्स जिओमध्ये फेसबुकने 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेसबुक कंपनीची जिओमध्ये 9.99 टक्के भागीदारी विकत खरेदी केली आहे. फेसबुकने यासंदर्भात बुधवारी मोठी घोषणा केली.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका व्हिडिओ निवेदनात या भागीदारीबद्दल माहिती दिली. मुकेश अंबानी यांनी सांगितले की, “दीर्घकालीन भागीदार म्हणून फेसबुकचे स्वागत करण्यात मला आनंद होत आहे. हा करार भारताला जगातील आघाडीच्या डिजिटल देशांपैकी एक बनविण्यासाठी फायद्याचा आहे”. तसेच, “मार्क झुकरबर्ग आणि माझ्यासाठी डिजिटल परिवर्तन आणि सर्व भारतीयांची सेवा करणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे”, असे सांगितले. मुख्य म्हणजे या भागीदारीत जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेल आणि व्हॉट्सअॅपवरही करार होणार आहे. या अंतर्गत रिलायन्स रिटेलच्या व्यवसायाला वेग देण्याचा करार होईल. JioMart आणि WhatsApp मिळून भारतातील 3 कोटी किराणा दुकाने सक्षम करणार असल्याचेही यावेळी मुकेश अंबानी यांनी सांगितले.