breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे – संजय राऊत

मुंबई – काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. एप्रिल महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. २१ दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. कोरोनावर मात केल्यानंतर सातव यांच्या शरीरात ‘सायटोमेगॅलो’ हा नवा विषाणू आढळला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती नाजूक झाली आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत हेदेखील सातव यांच्या निधनानंतर भावूक झाले असून त्यांनी ट्विटरवरून म्हटलंय, ‘राजीव सातव तू हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे. चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले. लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे. तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू?’, अशा शब्दात संजय राऊत यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

 

दरम्यान, दरम्यान, राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जात असत. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड करण्यात आली होती. अनेकदा राज्यातील बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ते शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत करून 2014 साली हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. हिंगोलीच्या खासदारपदी असताना त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, रेल्वे यांसारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला होता. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये ते सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 22 एप्रिल रोजी ट्विट करून त्यांनी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती, तसेच आपल्या संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button