breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

#INDvsENG पुढील तिन्ही टी-२० सामने प्रेक्षकांविना होणार

अहमदाबाद – देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा फटका भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेला बसला आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या पाच सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले असून तीन सामने अद्याप बाकी आहेत. या तीन सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन टी-२० सामने प्रेक्षकांविनाच खेळवले जातील.

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांत कोरोनाचा प्रसार वाढला आहे. गुजरातमध्येही कोरोनाने डोके वर काढले असून राज्यात दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्णसंख्येचे गांभीर्य लक्षात घेऊन गुजरात क्रिकेट मंडळाने भारत-इंग्लंड यांच्यातील 16 मार्च, 18 मार्च आणि 20 मार्चला होणारे टी-२० सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या तीन सामन्यांची तिकीटे ज्या प्रेक्षकांनी खरेदी केली आहेत त्यांचे पैसे गुजरात क्रिकेट असोसिएशनकडून परत केले जाणार आहेत.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दोन टी-२० सामन्यांना प्रेक्षकांची गर्दी झाल्याने अनेकजण सरकारवर टीका करत होते. या सामन्यात अनेक प्रेक्षकांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले. अनेक प्रेक्षकांनी मास्क परिधान केला नव्हता, तर सोशल डिस्टन्सिंगचेही तीनतेरा वाजले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button