breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

#INDIA vs ENGLAND: कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई – ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजयानंतर आता चेन्नईच्या चेपक मैदानावर कसोटी क्रिकेटचा थरार दिसणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंडमधील ४ कसोटी सामन्यांची मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यातील पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार विराट कोहली पुन्हा एकदा भारतीय संघाची कमान सांभाळणार आहे. तर अजिंक्य रहाणेवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियातील दिग्विजयी संघात मोठे बदल करण्यात आलेले नाहीत.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताच्या 18 खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून पृथ्वी शॉ, टी नटराजन आणि नवदीप सैनीला संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. तर अक्षर पटेलला पहिल्यांदाच कसोटीत स्थान देण्यात आले आहे. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांचे दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. इशांत शर्माने फेब्रुवारी 2020मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. आयपीएलमध्ये दुखापत झाल्याने त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले होते. तर हार्दिक पांड्या 2018 नंतर पहिली कसोटी खेळणार आहे. तसेच कर्णधार विराट कोहली पितृत्त्वाच्या रजेवरून परतणार आहे.

दरम्यान, मंगळवारी भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी केली. 32 वर्षानंतर भारताने 2-1ने कसोटी मालिका जिंकली. मात्र असे असले तरी भारतासाठी पुढचे आव्हान असणार आहे. ५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लडमधील क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिल्या दोन कसोटी सामान्यांपासून चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीने १८ जणांच्या संघाची घोषणा केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button