breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

उंच उडीत मरियप्पला रौप्य, शरदला कांस्य नेमबाज सिंघराज तिसरा

टोकियो – भारताच्या मरियप्पनने उंच उडीत रौप्य आणि त्याचाच सहकारी शरद कुमारने पॅरा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. नेमबाज सिंघराज अधानाने देखील कांस्यपदक मिळविले. 2016च्या रियो स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणार्‍या मरियप्पनला यंदा मात्र रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. गत वेळच्या रौप्य पदक मिळवणार्‍या अमेरिकेच्या सॅम ग्रेवने यंदा सुवर्ण पदकाची कमाई केली. नेमबाजीत 39 वर्षीय सिंघराज अधानाने 216.8 गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. भारताने या स्पर्धेत प्रथमच दोन आकडी पदकांची कमाई करताना आतापर्यंत 2 सुवर्ण, 5 रौप्य, 3 कांस्य पदके मिळविली आहेत. भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button