breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

ओएनजीसीने मच्छीमारांना भरपाई न दिल्यास हजारो नौका समुद्रात उतरवू

मुंबई – ओएनजीसी अर्थात तेल व नैसर्गिक वायूमंडळामार्फत सुरू असलेल्या सर्वेक्षणामूळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आता या मच्छीमारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी जाहीर केला आहे.या मच्छीमारांना ओएनजीसीने नुकसान भरपाई दिली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मंत्री शेख यांनी दिला आहे. या सर्वेक्षणाचा विरोध करत मुंबईतील सर्व मच्छीमार संस्थांना सोबत घेऊन सुमारे एक हजार नौका समुद्रात उतरवू असा गर्भित इशारा शेख यांनी दिला आहे.

वाचा :-पूर्व उपनगरांत तब्बल १७ कोटींची नालेसफाई

अस्लम शेख हे रविवारी विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी मढमध्ये आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये भाषण करताना शेख यांनी केंद्र सरकार व ओएनजीसीवर जोरदार हल्लाबोल केला. ओएनजीसी अधिकार्‍यांच्या वक्तव्यात आणि कृतीमध्ये साम्य नाही. फक्त बैठकांवर बैठका होत आहेत. मात्र, त्यातून मच्छीमारांच्या पदरी निराशेशिवाय काहीच पडत नाही. हे असे किती दिवस चालवून घ्यायचे? सगळ्या मच्छीमार संस्थानी मिळून एक जोरदार दणका या ओएनजीसी वाल्यांना देऊया, त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. माझी बांधिलकी मच्छीमार बांधवांशी आहे .त्यामुळे त्यांच्यासाठी मी स्वतः या आंदोलनाचे नेतृत्व करेन अशी ग्वाहीही शेख यांनी मुंबईतील मच्छीमार संस्थांना दिली.

दरम्यान ,मच्छीमार बांधव हे 2005 ते 2015 पर्यंतची 500 कोटींची भरपाईची मागणी सतत ओएनजीसी कंपनीकडे करत आहेत.परंतु सरकार आणि मच्छीमारांच्या या मागणीकडे ही कंपनी टाळाटाळ करत आली आहे. पालघर आणि मुंबईतील 70 पेक्षा जास्त कोळीवाड्यातील मच्छीमार 400 वर्षांपासून मच्छीमारी करत आहेत. त्यांच्याकडे सुमारे 10 हजार नौका आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button