breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Hinduism: हिंदुंनी तलवारीच्या जोरावर कोणाचे धर्मांतर केले नाही : नितीन गडकरी

नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

कोणत्याही हिंदू राजाने पाच हजार वर्षांच्या इतिहासात कधीही एकही मशीद उद्धवस्त केली नाही. तसेच त्यांनी तलवारीच्या जोरावर कोणाचेही जबरदस्तीने धर्मांतर केलं नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

आपली हिंदू संस्कृती प्रगतीशील, सर्वसमावेशक आणि सहिष्णू असल्याचेही ते म्हणाले. दिल्लीत आयोजित अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, “आम्ही मुस्लिम किंवा मुस्लिम संस्कृतीच्या विरोधात नाही. सर्वजण काफिर आहेत या प्रवृत्तीच्या आम्ही विरोधात आहोत. आमची संस्कृती संकुचित नाही, जातीयवादी नाही तसेच धर्मांधही नाही. जर भारताला भविष्यात जिवंत ठेवायचं असेल आणि तुम्ही सावरकरांना विसरुन गेलात तर भविष्यात चांगले दिवस राहणार नाहीत. मी हे खूपच जबाबदारीनं बोलत आहे, असेही गडकरी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button