breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढलंय का? आदित्य ठाकरेंचं भन्नाट उत्तर

पुणे |

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात राजकीय चिखलफेक काही थांबायचं नाव घेत नाही. दररोज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतच असतात. या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या राजकीय प्रदूषणाबद्दल राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पर्यायी इंधन परिषदेतील प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढले आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारलं असताना आदित्य ठाकरे यांनी ‘थ्री व्हीलर’चं चांगलं चालू आहे, असं भन्नाट उत्तर दिलं. अशा प्रकारची चतुर उत्तर आदित्य ठाकरे नेहमी देत असतात. त्यांना अनेक वेळा कोड्यात टाकणारे प्रश्न पत्रकार विचारत असतात. पण आदित्य ठाकरे गुगली ओळखून बरोबर षटकार ठोकत असतात.

पुण्यात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पर्यायी इंधन परिषदेतील प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले ,”पुणे हे शहर ऑटोमोबाईल साठी प्रसिद्ध आहे. पुणेकरांनी या प्रदर्शनात यावं इथे त्यांना चांगले पर्याय मिळतील. ज्या नागरिकांना इलेक्ट्रिक गाडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी हे प्रदर्शन आहे. राज्यात स्टार्टअप खूप आहेत आता त्यांना स्केल अप करायचे आहे. तर महाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील.” असं आदित्य ठाकरे म्हणालेत. दरम्यान, पर्यायी इंथान कुठल मिळेल याचा विचार चालू आहे. महाराष्ट्रात देखील स्क्रॅपिंग पॉलिसी येत्या काही दिवसात राबवणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणालेत. पुणे हे मुख्य केंद्र आहे. बाकीचे ठिकाण त्यांना फॉलो करतील, असंही देखील ठाकरे यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button