breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अनलॉक’नंतर महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ; दिल्ली महिलांसाठी असुरक्षितच!

मुंबई |

करोनानंतर सर्वकाही रुळावर येत असतानाच आता राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा महिलांवरील गुन्हे वाढू लागले आहेत. या गुन्ह्यांमध्ये ६ ते २० टक्के वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या आकडेवारीनुसार, अनलॉकनंतर विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत १,४२९ बलात्काराचे गुन्हे नोंदवले आहेत, तर या वर्षी ऑक्टोबरपर्यंत १७२५ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. विनयभंगाच्या घटनांमध्ये २०.४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत विनयभंगाचे २,१५७ गुन्हे दाखल झाले असून गेल्या वर्षी १,७९१ गुन्हे दाखल झाले होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनानंतर शहर अनलॉक झाल्यानंतर ही वाढ झाली आहे. करोनामुळे लॉकडाऊनमध्ये २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी बलात्काराच्या घटनांमध्ये २८ टक्के घट झाली होती. त्याचप्रमाणे विनयभंगाच्या घटनांमध्ये ३२.१९ टक्क्यांची घट झाली आहे. २०१९ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत २,१६८ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. जे गेल्या वर्षी २१ टक्क्यांनी घसरून १,६९९ वर आले. २०२० मध्ये दिल्लीत महिलांचे अपहरण आणि पळून जाण्याच्या एकत्रित २,३४४ प्रकरणे नोंदवण्यात आली. यावर्षी अशा ३,३४२ प्रकरणांची नोंद झाली आहे.

आकडेवारीनुसार, ९७ टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी पीडितांना ओळखत होते, तर सुमारे २ टक्के बलात्कार अनोळखी व्यक्तींकडून झाल्याची नोंद झाली आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता धोरण स्वीकारण्यास सांगितले आहे. सर्व जिल्हा डीसीपींना त्यांच्या वतीने बलात्काराच्या प्रकरणांच्या तपासावर थेट देखरेख करण्यास आणि पीडित अल्पवयीन असलेल्या प्रकरणांकडे अधिक लक्ष देण्यास सांगितले आहे. अधिका-यांनी सांगितले की ज्या भागात महिलांविरोधात अधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत त्यांचा नकाशा तयार करण्यासाठी एक अभ्यास केला गेला आहे आणि कारवाई केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button