breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नाशिकमध्ये १५ जानेवारीपासून द्राक्षांचे लिलाव सुरू होणार
नाशिक | प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ जानेवारीपासून द्राक्षांचे लिलाव सुरू होणार आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल पेठ रोडवरील शरद पवार बाजाराच्या आवारात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन नाशिक एपीएमसीचे सभापती देविदास पिंगळे यांनी केले आहे.
द्राक्षांचे आगार म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन केले जाते. तथापि द्राक्षाची मोठ्या प्रमाणावर शिवारात खरेदी होते. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होते. त्यांना रास्त भाव मिळत नाही. म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी १५ जानेवारीपासून द्राक्षांचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणावा, असे आवाहन एपीएमसीने केले आहे.