breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार
सामान्य नागरिक हवालदिल; सीएनजी, पीएनजी महागले
मुंबई – दीड महिन्यापासून इंधन दरवाढ थांबली असली तरी आता सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ सुरू झाली आहे. तिचा थेट फटका सामान्य नागरिक आणि वाहनधारकांना बसत आहे. त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. मुंबईत सीएनजी २ रुपयांनी तर पीएनजी १.५० रुपयांनी महागला आहे.
सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ झाल्यामुळे तो आता ६३ रुपये ५० पैसे किलो झाला आहे. घरगुती वापराचा पीएनजी गॅसही ३८ रुपये युनिट झाला आहे. या वर्षात मुंबईत सीएनजीच्या दरात ११ महिन्यांमध्ये १६ रुपयांची वाढ झाली आहे. त्याचा थेट फटका ८ लाख ग्राहकांना बसला आहे. यात ३ लाख खासगी सीएनजी कारमालक आहेत. याशिवाय रिक्षा, टॅक्सी आणि बस या सार्वजनिक वाहनातून प्रवास करणाऱ्यांनाही याचा फटका बसत आहे.