breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वर्षभरात कोकणात तिसऱ्यांदा फटका, सरकारने आतातरी मदत करावी; देवेंद्र फडणवीसांची मागणी
मुंबई – निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं होतं. त्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणची आणखी परिस्थिती भयाण झाली आहे. त्यामुळे सरकारने आता तरी कोकणाला मदत करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक भागांमध्ये सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील परिस्थिती भीषण आहे. गेल्या वर्षभरात कोकणाला बसलेला हा तिसरा फटका आहे. यापूर्वी निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळावेळी राज्य सरकारने कोकणाला मदत केली नाही. किमान आतातरी मदत द्यावी. तसेच आवश्यक त्या सर्व यंत्रणा मदतीसाठी तयार ठेवाव्यात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.