ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञाताकडून कचऱ्याला आग, बाजूला उभी असलेली चारचाकीही जळून खाक

भंडारा|कचरा पेटवायला गेले आणि चक्क चारचाकी पेटवून आल्याची घटना भंडारा शहरात घडली. अज्ञात व्यक्तीने कचऱ्याला लावलेल्या आगीचे लोट बाजूला उभ्या असलेल्या चारचाकीपर्यंत पोहोचल्याने चारचाकी जळून खाक झालीये. ही विचित्र घटना भंडारा शहरातील ए-वन लॉनसमोर मध्यरात्री घडली आहे.

भंडारा येथील तकियाच्या ए-वन लॉनला लागून काही दुकानांची गाळे आहेत. यात चारचाकीचे गॅरेज सुद्धा आहेत. या गॅरेजच्या गाड्या रात्री रस्त्याच्या कडेला उभ्या असतात. त्याच बाजूला गॅरेज वाले वाहनातून निघालेले पार्ट्स फेकतात अणि सोबत परिसरातील अन्य केर-कचराही इथे फेकला जातो.

रात्रीच्या दरम्यान एका अज्ञात इसमाने हा कचरा जाळला. परंतु कचर्‍याच्या आस पास ऑईल असल्यामुळे ही आग बाजूला उभ्या असलेल्या मारुती व्हॅनपर्यंत पोहोचली. यात पेटलेली गाडी ही कबाडीची असल्याने गाडी मालकाला मात्र आर्थिक नुकसान झालेले नाही. वेळीच अग्निशमन दल पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आता या विचित्र घटनेची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button