Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

उत्तर रत्नागिरीतील दापोली, खेड, गुहागर येथे घरावर दरड कोसळली, एका क्षणात उद्ध्वस्त झालं कुटुंब

रत्नागिरीः रत्नागिरी जिल्हयात दक्षिण रत्नागिरी येथील लांजा राजापूर येथे तर उत्तर रत्नागिरीतील दापोली, खेड, गुहागर येथे मंगळवारी दिवसभर झालेल्या तूफान पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरले होते तर दापोली व खेड येथे दोन ठिकाणी घरांवर दरड, भिंत कोसळल्याच्या घटना घडल्याने नगरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. खेड दभिळ येथील खाण कामगार संतोष थावरू चव्हाण वय वर्ष ४१ यांच्या घरावर दरड कोसळून संसार उद्ध्वस्त झाला आहे. तर, चव्हाण यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पण केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. तर, दुसऱ्या एका घटनेत इक्बाल नगर येथील घरांवर दरड कोसलळी. सुदैवाने ही सगळी कुटुंब सुखरूप असून २९ जणांचे तात्काळ स्थलांतर करण्यात आले आहे.

चव्हाण या खाण कामगाराच्या कुटुंबाचे घर एका क्षणात उध्वस्त झाले आहे. हे कुटूंब सध्या जवळच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहे. सुदैवाने हे कुटूंब कामानिमित्त बाहेर असल्याने बचावले आहे पण यावेळी घरात असलेली वीस वर्षीय स्नेहा चव्हाण ही तरुणी प्रसंगावधान राखत बाहेर पळाल्याने सुखरुप बचावली आहे. संतोष चव्हाण या खाण कामगारांचे कुटूंब या चिरेखाणीत वास्तव्यास होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक घरानजीक असलेली दरड कोसळून संपूर्ण घर चिरेखाणीच्या भिंतीखाली गाडले गेले. यात एक कार व दुचाकी दरडी खाली अडकून पडल्या. हे कुटूंबावर बेघर होण्याची पाळी आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मात्र या घटनेमुळे चिरेखाण कामगारांच्या सुरक्षित वास्तव्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खेड तालुक्यामध्येही गेल्यावर्षी दरड कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्यामुळे येथील प्रांताधिकारी राजश्री मोरे,तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरीक्षक निशा जाधव या सगळ्या प्रशासकीय महिला अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान यापूर्वीच खेड तालुक्यातील एकूण १५५ जणांना यापूर्वीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दापोली, पालगड, जामगे विभागातील इक्बाल नगर येथील २९ नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. अलीकडे कोकणात पावसाळ्यात दरडींचा धोका वाढत चालला असून यामध्ये नवीन ठिकाणांची भर पडताना दिसत आहे. या बदलत्या निसर्गाच्या चक्रात व बदलत्या जीवनामध्ये व विकासाच्या व्याख्येत नव्याने उभी राहणारी बांधकाम, घरे आदींमुळे जणू निसर्गदेवताच कोपली आहे की काय असा प्रश्न पडतो.

घरावर दरड कोसळली

दापोली तालुक्यातील दाभोळ ढोरसई, टेमकर वाडी, आसूद काजरेवाडी, हर्णै राजवाडी येथे या दरडी कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. या सगळ्या परिसराची पाहणी दापोली प्रांत अधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील, मंडळ अधिकारी सुदर्शन खानविलकर, श्री. गुरव, आदी कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. राजवाडीमधील तीन कुटुंब चौदा माणसे, फतेगड एकोणिस नागरिकांना तर दाभोळ ढोरसई परिसरात साईबाबांच्या मंदिराजवळ असलेल्या पाच घरातील एकोणतीस माणसांना स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान या सगळ्या संबंधित कुटूंबांना तेथील दरडींचा धोका लक्षात घेऊन महसुल प्रशासनाकडुन यापूर्वीच स्थलांतरित होण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button