राज्यात कडाक्याची थंडी,नागपुरात थंडीमुळे पाच जणांचा मृत्यू!
नागपूर | प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून पडत असल्याचं दिसत आहे. राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा 7 अंशांवर गेल्याचंही पहायला मिळत आहे. नागपुरात विविध ठिकाणी पाच जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे या पाचही जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमरावती आणि नागपूर. गोंदिया, धुळ्यात थंडीची लाट आली असून पहाटे आणि रात्रीच्या सुमारास धुक्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
नागपुरातील कपिलनगर, गणेशपेठ आणि सोनेगाव या ठिकाणी तिघांचा मृत्यू झाला आहे. एका 65 वर्षीय वृद्धाचा फुटपाथवर मृतदेह आढळून आला आहे. एका व्यक्तीचा मृतदेह ट्रकमध्ये आढळून आला आहे. तर एका अनोळखी महिलेचा मृतदेह शोनेगाव परिसरात आढळून आला आहे. या पाचही जणांचा मृत्यू थंडत गारठून झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील काही दिवस विदर्भासह राज्यभरात गारठा वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.