TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुख्यमंत्रीसाहेब आठवतंय का? रिफायनरी विरोधकांचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र

राजापूर, रत्नागिरी : रिफायनरी विरोधी संघटना बारसू सोलगाव पंचक्रोशी मुंबई ( oil refinery project in ratnagiri ) यांच्याकडून हे पत्र देण्यात आले आहे. संघटना अध्यक्ष वैभव कोळवणकर, सरचिटणीस नरेंद्र जोशी, खजिनदार किसन बाणे यांनी हे पत्र दिले आहे. ११ एप्रिलला हे पत्र देण्यात आले आहे. मात्र, अद्याप भेटीची वेळ अथवा कोणताही संपर्क आम्हाला केलेला नाही, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’शी बोलताना दिली.

आपण नाणार परिसरातील जनतेच्या विरोधाची दखल घेऊन विनाशकारी रिफायनरी प्रकल्प रद्द केला आहे. कोकणाची राखरांगोळी होऊ देणार नाही आणि कोकणाचे गॅस चेंबर होऊ देणार नाही अशी ग्वाही स्थानिकांना मुख्यमंत्री ( uddhav thackeray ) म्हणून आपण दिली होती, याची आठवण या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करुन देण्यात आली आहे. १२ जानेवारी २०२२ ला आपण मुख्यमंत्री म्हणून केंद्र सरकारला बारसू-गोवळ धोपेश्वर नाटे-राजवाडी येथील जमीन रिफायनरी व क्रूड ऑइल टर्मिनलसाठी उपलब्ध करून देतो अशा आशयाचे पत्र लिहिल्याचे माध्यमांमधून कळले. यामुळे आपल्याबद्दल जी लोकाभिमुख नायकाची प्रतिमा आमच्या मनात होती तीला तडा गेला, असं पत्र म्हटलं आहे. आमच्या परिसरात बारसु-सोलगाव धोपेश्वर येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित करण्याबाबत शिवसेनेचे खासदार व पक्षाचे सचिव विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेकडून वक्तव्य केली जात आहेत. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा रत्नागिरी मतदारसंघाचे आमदार उदय सामंत रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणून विशेष प्रयत्नशील आहेत, असे समजते असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

लोकांचा विरोध असेल तर रिफायनरी लादणार नाही, अशीच महाविकास आघाडी व शिवसेना पक्षाचीही भूमिका आहे, असे आम्ही मानतो. पण देवाचे गोठणे, शिवणे खु., सोलगाव, गोवळ, धोपेश्वर आणि आंबोळगाड या गावांचे रिफायनरी विरोधाचे मासिक सभांचे नव्हे तर ग्रामसभाचे ठराव झालेले आहेत. आपल्याकडे देण्यासाठी ५००० ग्रामस्थांचे रिफायनरी विरोधात सह्यांचे निवेदन आम्ही खासदार विनायक राऊत यांचेकडे दिले होते. १८ मार्चला आझाद मैदानावर २००० ग्रामस्थांनी धरणं आंदोलन केले. तेव्हाही आपल्याला भेटण्यासाठीचे निवेदन देण्यात आले. पण भेट सोडा कुठलाही निरोप आम्हाला आला नाही. आमच्या प्रामाणिक आंदोलनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेले, असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला आमची भूमिका मांडण्यासाठी वेळ दया, अशी विनंती या पत्रात करण्यात आला आहे.

कोकणात राजकीय वातावरण तापलं, दोन वजनदार नेते ईडीच्या रडारवर?

आम्ही ५००० हून अधिक स्थानिक ग्रामस्थांनी ३० मार्चलातहसील कार्यालयावर रिफायनरी विरोधात मोर्चा काढला होता. आपल्यापर्यंत स्थानिकांची विरोधाची भूमिका पोहचली आहेच. पण प्रत्यक्ष भेटून ती सविस्तरपणे आपल्यासमोर मांडण्यासाठी आम्हा स्थानिक ग्रामस्थानां वेळ द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. राज्यपालांनाही भेटीसाठी वेगळे पत्र देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button