भाजप सत्तेत असताना काश्मीरी पंडितांचे विस्थापन – शरद पवार
नवी दिल्ली |
द काश्मीर फाईल या चित्रपटावर सध्या संपूर्ण देशातील राजकारण तापलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या चित्रपटाचं कौतुक करतानाच सर्वांनी हा चित्रपट पाहायला हवा असे विधान केले. तर विरोधकांकडून मात्र या चित्रपटाला विरोध केला जातोय. काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी या चित्रपटावर टीका केली होती. तर आता या चित्रपटावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.. द काश्मीर फाईल या चित्रपटावरून देशात द्वेषाचे राजकारण सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रविवारी पुण्यात माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
शरद पवार झाले, काश्मीर मधून पंडित जेव्हा बाहेर पडले तेव्हा सत्तेत व्ही पी सिंग यांचे सरकार होतं. त्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता. म्हणजेच भाजप सत्तेत असताना काश्मीर मधून पंडित बाहेर गेले असा दावाही पवार यांनी केलाय. पुढे बोलताना ते म्हणाले, विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे मात्र टीका करताना विद्वेष नसायला हवा. काश्मीर फाईल या चित्रपटामुळे मन जोडण्याऐवजी मन तोडण्याचं काम झालं. समाजात विद्वेष पसरवायला मदत केली जाते. पंतप्रधान मोदींकडून ही त्यावर भाष्य केले जाते असं म्हणत शरद पवार यांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली.