breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

#Covid-19: “…पुढील वर्षही सुरक्षित वाटत नाही”

नवी दिल्ली |

देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु असलं तरी दुसरीकडे डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. केंद्र सरकारने वर्षअखेरीसपर्यंत १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र लसीकरणाचा वेग आणि नव्या विषाणूचा वेग पाहता पुढील वर्षदेखील सुरक्षित वाटत नसल्याचं काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलं आहे की,”शंकी होती त्याप्रमाणेच मोदी सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र बदललं आहे. वर्षअखेपर्यंत सर्वांना लस देण्याचं आपलं आश्वासन मागे घेतलं आहे. ज्या वेगाने लसीकरण सुरु आहे आणि नवा व्हेरियंट पसरत आहे त्यावरुन पुढील वर्षही सुरक्षित वाट नाही”.

देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु असून लवकरच १२ ते १८ वर्षातील मुलांसाठी लस उपलब्ध होणार आहे. भारतीय औषध कंपनी झायडस कॅडिलाकडून ही लस तयार करण्यात आली आहे. केंद्राने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. महिन्याच्या सुरूवातीच्या धोरणात बदल करण्यात आल्यानंतर लसीकरण मोहिमेबद्दल सुप्रीम कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांना उत्तर देताना सुप्रीम कोर्टाने वर्षअखेरपर्यंत देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्याची योजना असल्याची माहिती दिली. १८ वर्षांपुढील नागरिकांची एकूण लोकसंख्या ९३ ते ९४ कोटी असून त्यासाठी एकूण लसींच्या १८६ डोसची गरज असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. सर्व वयोगटासाठी केंद्रावर पोहोचल्यानंतर लस देण्याची सुविधा निर्माण करण्यात आले असून यापुढे ऑनलाइन नोंदणी बंधनकारक नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने न्यायालयात सांगितलं आहे. लसीकरण धोरण स्थिर असल्याचं सांगताना केंद्राने नव्या धोरणानुसार सोमवारपासून १८ वर्षांपुढील सर्वांसाठी लसीचे डोस मोफत असल्याची माहिती दिली आहे. दुसरीकडे केंद्राने राज्यांना बनावट लसीणकर शिबीरांची चौकशी करुन कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button