breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: सायकलवरून घरी निघालेल्या कामगाराचा रस्त्यातच मृत्यू

लॉकडाउन लागू केल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्व कामगारांना आहेत तिथेच थांबवण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, अनेक कामगारांनी घराचा रस्ता पकडला होता. अगदी ४०० ते ५०० किमी अंतर चालून काहींनी घर जवळ केले, तर काहींचा रस्त्यातच मृत्यू झाल्याच्या घटना लॉकडाउनच्या कालावधीत घडल्या. अशीच एक घटना शुक्रवारी घडली आहे. भिंवडीवरून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी सायकलवरून जाणाऱ्या कामगाराचा रस्त्यातच मृत्यू झाला.

लॉकडाउनच्या काळात अनेक कामगारांनी लपूनछपून घर गाठण्याचा प्रयत्न केला. यापैकी काही जण घरी पोहोचले, तर काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, घरी जाणाऱ्या कामगारांची संख्या कमी होताना दिसत नाही. भिंवडीवरून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी एक कामगार सायकलवरून निघाला होता. बारवणी जिल्ह्यातील बिजासन गावाजवळ तो सायकलवरून कोसळला. प्रशासनातील कर्मचाऱ्यांना हा कामगार बेशुद्धावस्थेत सापडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती उपजिल्हाधिकारी जी. धनगर यांनी ही माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button