breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: “लोकांना घरभाडं घेऊ नका म्हणणारे, रेल्वेला तिकिटाचे पैसे न घेण्याचं आवाहन का करत नाही”

करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या कामगारांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रोजगार बंद, पैशांची अडचण यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यानं अनेक कामगारांनी आपापल्या घरी जाण्यास सुरूवात केली. लॉकडाउनचा तिसऱ्या टप्प्याची घोषणा करताना केंद्र सरकारनं विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडण्यास परवानगी दिली. त्यानंतर कामगारांना घरी सोडण्यात येत असून, त्यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या रेल्वे भाड्यावरून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

केंद्र सरकारनं विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यास परवानगी दिल्यानंतर देशभरातून गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र, मजुरांकडे तिकिटासाठीही पैसे नसल्याचा मुद्दा समोर आला. यावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर टीका करत, कामगारांच्या घरी जाण्याचा खर्च उचलण्याची घोषणा केली. त्यानंतरही मुद्यावरून वादविवाद सुरू असून, समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

“लोकांना घरभाडं न घेण्याचं आवाहन करणारे, तिकिटाचे पैसे न घेण्याचं आवाहन रेल्वेला का करत नाही. ऑनलाईन तिकीट आरक्षित करण्याबद्दल गरिबांना माहिती आहे का? इंटरनेट कॅफे आणि एजंट यांची सेवा बंद आहे. त्यात गरिबांकडे अॅपसाठी स्मार्ट फोन नाही आणि सुटही (कन्सेशन) नाही,” अशा शब्दात अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button