breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: रायगडमधील सहा तालुक्यांना कुठलाही दिलासा नाही

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील सहा तालुक्यांना लॉकडाउमधून कुठलाही दिलासा दिला जाणार नाही. त्याचबरोबर श्रीवर्धन, पोलादपूर, उरण आणि पनवेलमधील प्रतिबंधीत क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी कायम राहील. इतर तालुक्यातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी सोमवारी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button