breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: रायगडच्या सागरी सीमाही आता बंद

रायगड जिल्ह्यातील सागरी सीमाही आता जलवाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईतून अनेक जण सागरी मार्गाने रायगड जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्व मासेमारी तसेच प्रवासी बंदरांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतो आहे. त्यामुळे भयभित झालेले चाकरमानी मिळेल त्या मार्गाने कोकणात दाखल होण्यास सुरवात झाली आहे. रस्ते महामार्ग बंद करण्यात आल्याने, अनेक जण रेल्वे मार्गावरून चालत अथवा मच्छीमार बोटींच्या मदतीने रायगड जिल्ह्यात दाखल होण्याचे प्रयत्न करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. मुंबईतील ससून डॉक आणि वरळी येथून मच्छीमार बोटींच्या साह्याने रायगड आणि नवी मुंबईत दाखल होण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. यानंतर प्रशासकीय यंत्रणांनी सागरी सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button