breaking-newsमनोरंजन

#CoronaVirus: “मोदींचं माफी मागणं पुरेसं नाही”; लॉकडाउनच्या निर्णयावरून अभिनेता संतापला

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने तब्बल २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. लॉकडाउनमुळे देशातील जनता आपल्या घरातच कैद झाली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारच्या मन की बात या कार्यक्रमात देशवासीयांनी माफी देखील मागितली. मात्र यावरुन अभिनेता कमाल खानने मोदींवर उपरोधीक टोला लगावला आहे.

बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त आणि विचित्र विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1244328138491998213?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1244328138491998213&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranjan-news%2Fkrk-not-happy-over-coronavirus-lockdown-narendra-modi-mppg-94-2119489%2F

“अखेर मोदीजींनी लॉकडाउनबाबत केलेली चूक मान्य केली. तसेच माफी देखील मागितली. मात्र त्यांची माफी पुरेशी नाही. कारण लॉकडाउनमुळे गरीब लोकांचे झालेले हाल ते आमरण विसरणार नाहीत.” अशा आशयाचे ट्विट करुन केआरकेने मोदींवर खोचक टीका केली आहे.

देशभरातील लोक सध्या लॉकडाउनमुळे त्रस्त आहेत. अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर केआरकेचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button