breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus : महाराष्ट्र ठप्प, कर्फ्यूला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई | पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्याप्रमाणे देशभरात जनता कर्फ्यू लागू झाला आहे. राज्यातही कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. 14 तासांच्या जनता कर्फ्यूला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली, परंतु राज्यभरातून मिळालेली छायाचित्रे पाहिल्यानंतर असे दिसते की शनिवारपासून कर्फ्यू लागू होताना दिसून आला.
राज्यातील जवळपास सर्वच शहरे लॉकडाउन आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद आहे. बहुधा देशाच्या इतिहासात प्रथमच लोकांनी स्वत: कर्फ्यूसाठी तयारी केली आणि त्याची अंमलबजावणीही करीत आहेत.