breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ८३४, आत्तापर्यंत १९ जणांचा मृ्त्यू
करोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन पुकारला आहे. दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८३४ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात देभशरात ७५ रुग्ण वाढले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मागच्या दोन महिन्यात विदेशातून भारतात १५ लाख प्रवासी आले आहेत. या सगळ्यांना देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
Death toll due to COVID-19 touches 19; number of cases rises to 834: Union Health Ministry
— Press Trust of India (@PTI_News) March 28, 2020