breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: भारतातील कोरोनाग्रस्तांनी पार केला 47 लाखांचा टप्पा; मागील 24 तासात 94,372 नवे बाधित रुग्ण
नवी दिल्ली: भारतातील कोरोनाग्रस्तांनी 47 लाखांचा आकडा पार केलेला आहे. गेल्या 24 तासात देशात 94,372 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 1,114 जणांचा कोरोमुळे बळी गेला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47,54,357 इतकी झालेली आहे.
सध्या 9,73,175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 37,02,596 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. याशिवाय आतापर्यंत 78,586 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याची नोंद करण्यात आलेली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिलेली आहे.