breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: भाजपला परिस्थितीच भान नाही! बापुराव सोलनकर

बारामती :- महाराष्ट्रामध्ये राज्यसरकार कोरोना विरुद्धच्या लढाई मध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करीत आहे, भारतीय जनता पक्ष जाणून बुजून “काळे झेंडे ” आंदोलन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, राज्यातील भाजपच्या खासदार, आमदार, पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री फंडाला निधी देण्याऐवजी PM care ला निधी दिला, आंदोलन करण्याचा भाजपला खरंच नैतिक अधिकार आहे ? असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर यांनी भाजपला टोला लगावला आहे. भाजप स्वत:च्या घराच्या अंगणालाच ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत. आज, महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त कोरोना योद्ध्यांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीनं लढत असताना अशा आंदोलनातून या लढाईत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा हा डाव आहे हा प्रयत्न राज्यातील जनततेने हाणून पाडला पाहिजे

भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी पुकारलेले काळे झेंडे आंदोलन हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. आज कोरोना मूळे लोक अडचणीत आहेत. लोकांना सर्वांनी मिळून आधार देण्याऐवजी आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्न आहे,

मुंबईसह महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना आघाडी सरकारच्या वतीने केल्या गेल्या आहेत. आरोग्य सेवा सक्षम करण्यात आली राज्यसरकारने आतापर्यंत सहा लाखांहून अधिक परप्रांतीय मजूरांच्या निवास, भोजन आणि वैद्यकीय उपचारांची सोय केली. आजमितीला ५ लाख परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात सुखरुप परतले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक यंत्रणा, प्रत्येकजण आपापल्या परीने या लढाईत सहभागी झाला आहे. असे असताना भाजपने ‘काळे झेंडे’सारखे आंदोलन करुन महाराष्ट्रातील कोरोना योद्ध्यांचा अपमान करुन नये. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भाजपने अडथळे आणू नयेत. आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावे, महाराष्ट्राविरुद्धच्या कटाचा भाग बनण्याचं पाप माथी घेऊ नये, असे आवाहन करतानाच कोरोनाविरुद्धची लढाई सर्व आव्हानांवर मात करू जिंकेल असा विश्वास बापुराव सोलनकर यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button