#CoronaVirus: ‘कोरोना गो… म्हटल्यामुळेच महाराष्ट्रात देशात तो जास्त आला नाही’- आठवले
मुंबई | महाईन्यूज
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, अशातच कोरोना व्हायरसचे देशात 73 रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी गो कोरोना गो… कोरोना गो… असे म्हणत कोरोनाला भारतातून घालवणार असल्याचं म्हटलेलं होतं. आता, मी गो कोरोना गो.. म्हटल्यामुळे कोरोना महाराष्ट्रात आला नसल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.
कोरोना रुग्णांवर पुण्यासह देशभरातील विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. याबाबत मोठ्या प्रमाणात जगजागृती करण्यात येत आहे. आरोग्यमंत्र्यांकडूनही योग्य ती माहिती पुरविण्यात येत आहे. त्यातच, केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये, चायना-इंडिया साँग असे म्हणत, रामदास आठवले कोरोनो गो… गो कोरोना… गो… असे म्हणत आहेत. तर, आठवलेंसमवेत असलेला विदेशी नागरिकही गो कोरोना… कोरोना गो… असे म्हणताना आपण पाहिलं. आठवलेंच्या या व्हिडीओवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केलंय. तसेच, केंद्रीयमंत्र्यांना हे शोभतं का, असा सवालही नेटीझन्सने केला. मात्र, जोपर्यं कोरोना जात नाही, तोपर्यंत मी गो कोरोना… म्हणतच राहणार असे आठवेलंनी म्हटले आहे.