breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: एपीएमसी मार्केट एका आठवड्यासाठी पूर्पणणे बंद ठेवण्याचा निर्णय
करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नवी मुंबईमधील एपीएमसीची पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अन्नधान्य, भाजी, फळ, कांदा-बटाटा, मसाला मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहे. सोमवारपासून एका आठवड्यासाठी म्हणजे ११ ते १७ मे पर्यंत मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहे. कोकण आयुक्त, पोलीस, माथाडी नेते यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मार्केट बंद असणाऱ्या वेळेत व्यापारी, कामगारांची तपासणी केली जाणार आहे.