breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#CoronaVirus: …अन्यथा मंत्रालयात प्रवेशबंदी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

राज्यातील करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारकडून प्रतिबंधात्मक पावलं टाकली जात आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारनं मंत्रालयात सामान्य नागरिकांना प्रवेश बंदी केली होती. महत्त्वाचं काम असलेल्यांनाच प्रवेश दिला जात होता. मात्र, त्यात आणखी एक निर्णय सरकारनं घेतला आहे. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि भेटीसाठी येणाऱ्यांना मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. मास्कशिवाय येणाऱ्यांना मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नाही. हा निर्णय पुढील आदेश मिळेपर्यंत लागू असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button