#CoronaVirus:देशात मागील 24 तासात 445 बळी
नवी दिल्ली : जगासह देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या 24 तासात पहिल्यांदाच देशात 400 पेक्षा जास्त बळी कोरोनामुळं गेले आहेत. 24 तासात 445 बळींची नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 821 ने वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 26 हजार 910 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 37 हजार 252 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 55.77 टक्के आहे.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार सध्या कोरोनाची लागण असलेले 175,955 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 237,252 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या 24 तासांत 9 हजार 440 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्या 13 हजार 703 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 132075 इतका झाला आहे. 65744 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. तर आतापर्यंत 6170 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य
तामिळनाडू 59377 रुग्ण, 32754 बरे झाले, मृतांचा आकडा 757
दिल्ली 59746 रुग्ण, 33013 बरे झाले, मृतांचा आकडा 2175
गुजरात 27260 रुग्ण, 19349 बरे झाले, मृतांचा आकडा 1663
राजस्थान 14930 रुग्ण, 11597 बरे झाले, मृतांचा आकडा 349
मध्यप्रदेश 11903 रुग्ण, 9015 बरे झाले, मृतांचा आकडा 515
उत्तरप्रदेश 17731 रुग्ण, 10995 बरे झाले, मृतांचा आकडा 550
प.बंगाल 13945 रुग्ण, 8297 बरे झाले, मृतांचा आकडा 555
last24Hours