#CoronaVirus:कोरोनाबाधितांच्या मृतदेहांची होणारी हेळसांड प्रकरणी,सर्वोच्च न्यायालयाचा संताप
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांना योग्य ते उपचार मिळण्यासंदर्भात आणि या आजारामुळं मृत पावणाऱ्यांच्या मृदेहांना किमान सामाजिक भान जपत वागणूक देण्याप्रकरणी सर्वोच्च न्यायायलयात शुक्रवारी सुनावणी झाली.
कोरोना रुग्णांवरील उपचार आणि कोरोनाबाधितांच्या मृतदेहांची होणारी हेळसांड याप्रकरणी सुनावणी करत न्यायमूर्ती संजय किशन कौल, एम.आर.शाह आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठानं दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारचा खडे बोल सुनावले.
सदर प्रकरणीची पुढील सुनावणी १७ जूनला होणार आहे. दिल्लीमध्ये ६० वर्षीय व्यक्तीला अनेक रुग्णालयांनी दाखल करण्यास नकार दिला, परिणामी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला ज्याची दखल थेट सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आली.
सध्याच्या घडीला विविध रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर होणारा उपचार आणि या व्हायरसची लागण झाल्यामुळे मृत पावलेल्यांच्या मृतदेहांची होणारी हेळसांड पाहता हा मुद्दा अधोरेखित करत त्यांना दिली जाणाऱ्या वागणुकीवर सर्वोच्च न्यायालयानं तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. जे करत असतेवेळी सर्वोच्च न्यायालयानं केंद्रासोबतच राज्य सरकारलाही धारेवर धरलं.