breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

नागरिकांनी सतर्क राहावे; मुंबई महापालिकेची सूचना

मुंबई – पहिल्याच पावसात खोळंबलेले मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र हवामान विभागाने मुंबई आणि लगतची उपनगरे, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई महापालिकेने ट्विट केले आहे की, ‘भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. तसेच पुढील चार दिवसांसाठी मुंबईत ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. नागरिकांनी कृपया सतर्क राहावे व स्वतःची काळजी घ्यावी अशी विनंती.’

दरम्यान, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि लगतच्या परिसरात मान्सूनने दमदार एन्ट्री केली. पहिल्याच पावसात मुंबईसह उपनगरात दाणादाण उडाली. काल दिवसभर मुंबईला झोडपून रात्रभर काहीशी विश्रांती घेतल्यानंतर आज मुंबई शहरात सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. भायखळा, लालबाग, काळाचौकी परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.

मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग
भायखळा – २५ मिमी, चेंबूर 280.52 मिमी, मानखुर्द, गोवंडी – 248.52 मिमी, घाटकोपर – 21022 मिमी तर कुर्ला परिसरात 231.45 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात मरोळ येथे सर्वात जास्त म्हणजे 272 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर अंधेरी (पूर्व) 271.76 मिमी, मालवणी 253.88 मिमी, गोरेगाव 217.36 मिमी, अंधेरी ( प.) 215.03 मिमी, दहिसर 208.22 मिमी, सांताक्रूझ 207.64 मिमी, वर्सोवा 207.44 मिमी, वांद्रे 86.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button