breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

स्वपक्षीय आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्नेहभोजन; केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन खल

मुंबईः  राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांच्या मागे लागलेला ईडी (सक्तवसुली संचालनालय) कारवाईचा ससेमिरा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यांविरोधातील सुरू असलेली ईडीची कारवाई या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणावरून शिवसेनेचे नेते आणि आमदारांसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी बुधवारी रात्री स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. महाविकास सरकार किंवा शिवसेनेच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी कितीही कारवाया करण्याचा प्रयत्न केला तरीही डगमगून चालणार नाही, असा संकेतच यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यानिमित्ताने सर्वच राजकीय पक्षांचे आमदार मुंबईत मुक्कामी आहेत. शिवसेनेचेही आमदार अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तसेच, नेत्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू आहेत. या कारवाया राजकीय सूडापोटी होत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. मात्र केवळ गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात या कारवाया सुरू असल्याचा दावा विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बुधवारी रात्री ८ वाजता शिवसेनेच्या नेत्यांसाठी तसेच, आमदारांसाठी हे स्नेहभोजन झाले.

आमदारांच्या शंकांचे निरसन…

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीदेखील महाविकास आघाडीतील सर्व आमदारांचे स्नेहभोजन झाले होते. यावेळी तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी आमदारांना मार्गदर्शन केले होते. बुधवारी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात, गप्पांच्या निमित्ताने आमदारांशी संवाद साधला. आमदारांच्या शंकांवर तसेच, तक्रारींवर यावेळी त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button