breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार
मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे काही भागात डेल्टा प्लस प्रकाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या कोरोना टास्क फोर्सची बैठक होणार आहे. त्यापूर्वी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहे. रात्री ८ वाजता मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील. यावेळी ते कोणता संदेश देतात? कोणती मोठी घोषणा करतात? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी आक्रमक मागणी आता होत आहे. तर व्यापारी वर्गही राज्य सरकारकडे शिथिलता देण्याची मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री जनतेशी काय संवाद साधणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.