breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मास्क वापरणे थांबवू नये, मुख्यमंत्र्यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन

मुंबई : ‘करोनारुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून, राज्यातील नागरिकांनी मास्क वापरणे थांबवू नये,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून केले. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली, तरी करोना पूर्णपणे गेलेला नाही, हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यासाठी मास्क घालत राहणे, लस घेणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असून, ते वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

राज्याचे साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १.५९ टक्के असून, मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आढळते आहे. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली असून, ठाण्यामध्ये २७.२ टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात अनुक्रमे १८.५२ टक्के, तर ६८.७५ टक्के इतकी वाढ झाली आहे. दरम्यान, सध्या केवळ एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, १८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तसेच १८पेक्षा जास्त वयाच्या ९२.२७ टक्के नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button