पाच राज्यांत भाजपाची सत्ता येणार- रामदास आठवले
पंढरपूर |
पाच राज्यांत भाजपा आणि मित्र पक्षाची सत्ता येणार असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले विविध विकासाच्या निर्णयावर राज्यात सत्ता मिळेल असेही ते म्हणाले. तसेच पुढील लोकसभेला भाजपा आणि मित्रपक्ष ४०४ जागा जिंकेल असे भाकीत आठवले यांनी केले. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. पाच राज्यांतील निवडणुकीसाठी काही ठिकाणी पहिल्या टप्प्यात मतदान झाले आहे. या पाचही राज्यांत भाजपाची सत्ता येईल असा विश्वास मंत्री आठवले यांनी व्यक्त केला आहे. देशाचे पंतप्रधान मोदी यांनी अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. अनेक योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला आहे. त्याचा फायदा भाजपाला होईस असे ते म्हणाले.
आठवले यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पाबाबत भरभरून कौतुक केले. माझ्या खात्याला भरघोस निधी देताना पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हात आखडता घेतला नाही असे म्हणत आठवले यांनी ‘‘ हे बजेट आहे विकासाची गंगा .. उगाच घेऊ नका मोदीवर शंका ’’ अशी कविता सादर केली. तसेच गेल्या दोन टर्मला भाजपा ३०३ जागा निवडून आल्या. आता या पुढील निवडणुकी ४०४ जागा निवडून येईल असे भाकित मंत्री आठवले यांनी केले. या वेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि आरपीआय सत्तांतर घडवेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.