भाजप सत्ता गेल्यानं विचलित, मृतांच्या टाळूवरचं लोणी खायलाही विसरत नाहीत- मनीषा कायंदे
मुंबई – भांडूप येथे एका मॉल मध्ये जिथे आता कोव्हिड सेंटर उभारलं होतं तिकडे एक दुर्दैवी प्रकार घडला आणि त्या ठिकाणी आग लागली. अनेक लोक मृत्युमुखी पडली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिकडे पाहणी करायला गेले. त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील गेले. परंतु तिकडे जाऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करणे. आगीची पाहणी करणे किंवा त्याची चौकशीची मागणी करणं हे आम्ही समजू शकतो. परंतु तिकडे जाऊन देखील महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेले राजकीय विषय हे देखील ते बोलायचे विसरले नाहीत, अशी टीका शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केली आहे.
वाचा ;-छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने करा, सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता गेल्यामुळे इतकी विचलित झाले आहेत की मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला देखील ते विसरत नाहीत. आता महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी खरा चेहरा ओळखलेला आहे. सिताराम कुंटे यांच्या सारखे एक मराठी आयएएस अधिकारी यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. अशा अधिकाऱ्यांवर देखील ते आता अविश्वास दाखवत आहेत आणि त्यांची बदनामी करत आहेत हे अतिशय घृणास्पद आहे, असंही मनीषा कायंदे यावळी म्हणाल्या.
गृह विभागाचा अहवाल जो एक प्रसिद्ध झाला त्याबद्दल तपास निश्चितच होईल. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्याबद्दल सविस्तर बाजू मांडली आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी जो कबुलीजबाब दिलेला आहे तो देखील सगळ्यांनी ऐकलेला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोण राजकारण करत आहे आणि कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना बळी पाडले जात आहे. त्यांना हाताशी धरुन राजकारण केले जात आहे, असं मनीषा कायंदेंनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, मनसुख हिरेन याच्या तोंडामध्ये जे रुमाल कोंबले होते ते आता गायब झाले आहेत, असे सांगण्यात येत आहे. हा तपास ‘एटीएस’ करत होती आणि आता तपास ‘एनआयए’कडे सोपवला आहे. त्यामुळे सत्य लवकरच बाहेर यावं असं आम्हाला देखील वाटतं, असं देखील मनीषा कायंदे म्हणाल्या.