बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे कोसळले, चौकशी समितीचा अहवाल
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर ८ डिसेंबरला तामिळनाडूत कोसळून अपघात झाला. त्यात रावत आणि त्यांच्या पत्नीसह १४ जण ठार झाले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्यांनी महिनाभर केलेल्या चौकशीनंतर हा अपघात खराब हवामानामुळे झाला असल्याचा निष्कर्ष काढला आहे. तसा अहवाल समिती सादर करण्याची शक्यता आहे. मात्र याला सरकार किंवा हवाई दलाने दुजोरा दिलेला नाही.
जनरल बिपिन रावत त्यांची पत्नी आणि अन्य अधिकारी असलेल्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूत अपघात झाला. त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर या अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने जवळपास महिनाभर चौकशी केल्यानंतर खराब हवामानामुळे हा हेलिकॉप्टर अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. खराब हवामानामुळे वैमानिक काहीसा गोंधळला. त्यामुळे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडली, असे समितीने अहवालात नमूद केल्याचे समजते. मात्र त्याला हवाई दल किंवा केंद्र सरकारने दुजोरा दिलेला नाही. या अपघाताला मानवी चूक किंवा तांत्रिक बिघाड कारणीभूत आहे का? याची चौकशी करण्यासाठी एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली तज्ञांचे पथक चौकशी करत आहे. त्यात इतर शक्यतांचीही चाचपणी केली जात आहे. मात्र परिस्थितीजन्य पुराव्यावरून खराब हवामानामुळे दृश्य घनता कमी झाली. परिणामी पायलट गोंधळल्याने हा अपघात झाला असावा, असा निष्कर्ष या समितीने काढला आहे.