ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

बंगळुरू विमानसेवा १५ एप्रिलपासून सुरू

औरंगाबाद | बंगळुरू विमानसेवा १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे संकेत विमानसेवा प्राधिकरण संचालक डी. जी. साळवे यांनी दिले आहे. ‘इंडिगो कंपनी’कडून विमान चालविण्यात येणार असून, बंगळुरूसह चेन्नईचेही कनेक्शन औरंगाबादला मिळणार असल्याचे संकेत डी. जी. साळवे यांनी दिले.

औरंगाबाद विमानतळावरून करोना काळापूर्वी बँगरूळू साठी इंडिगो सह स्पाईस जेट विमान सेवा सुरू होती. औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्राशी जुडलेले व्यवसायीकांसह, उदयोजक आहेत. यामुळे करोना काळापुर्वी बंगळुरूसाठी विमान सेवा सुरू करण्याची मागणी झाली होती. त्यानंतर विमान सुरू करण्यात आले होते. या विमानांना चांगला प्रतिसाद मिळत होता; मात्र करोनाकाळात स्पाइस जेटने विमान सेवा बंद केली. करोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर ‘इंडिगो’ने मार्च महिन्यात दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा नियमित केली आहे.
‘इंडिगो कंपनी’ने सकाळच्या सत्रात औरंगाबाद विमानतळावरून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून विमानतळावरून विमान धावपट्टीच्या विस्ताराचे काम सुरू आहे. यामुळे सदर विमानासाठी वेळ मिळत नसल्याची माहिती समोर आली होती; मात्र विमानतळ संचालक डी. जी. साळवे यांनी सदर काम सुरू करण्यापूर्वी सकाळी नऊच्या पूर्वी औरंगाबादहून बंगळुरूसाठी स्लॉट देण्याबाबत उपयुक्तता दर्शविली आहे. यामुळे आगामी १५ एप्रिलपासून औरंगाबाद विमानतळावरून बंगळुरूसाठी विमानसेवा मिळणार आहे. हे विमान चेन्नईशी कनेक्टिंग असेल, अशी माहिती डी. जी. साळवे यांनी दिली.

शिर्डीसाठी ‘इंडिगो’ने सुरू केलं होतं विमान

औरंगाबाद विमानतळावरून बंगळुरूसाठी जाणारे विमान शिर्डीहून सुरू करण्यात आले होते. शिर्डीहून विमान सुरू झाल्याने, औरंगाबादहून पुन्हा बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होईल किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झालेला होता; मात्र १५ एप्रिलपासून हे विमान सुरू होणार असल्याने बंगळुरूचा प्रश्न मिटला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button