breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

उन्हापासून संरक्षण म्हणून आंदोलक शेतकऱ्यांनी सीमारेषेवर बांधली कच्ची घरे

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी गेल्या तीन महिन्यांहून अधिक कालावधीपेक्षा दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. भर थंडीतही त्यांनी आपलं आंदोलन मागे पडू दिलं नाही. आता कडाक्याच्या उन्हातही त्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं असून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमारेषेवर विटांचं कच्च बांधकाम करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्या भूमिकेवर ठाम राहून दीर्घकालीन संघर्षासाठी शेतकऱ्यांनी तयारी केल्याचं स्पष्ट होत आहे.

हरियाणाच्या टिकरी सीमारेषेवर शेतकरी ही बांधकामं करताना दिसत आहेत. टिक्री बॉर्डर, बहादुरगड रोड या ठिकाणी अशी अनेक बांधकामं होताना दिसत आहेत. त्यामध्ये काही घरांना सिमेंटने पक्कं केलं जात आहे तर काही घरांसाठी मातीच्या थराचा वापर केला जात आहे. आत्तापर्यंत या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, ट्रॉली किंवा कापडी तंबू हेच या शेतकऱ्यांसाठी निवारा होता. पण शेती कामासाठी ट्रॅक्टर आपापल्या गावी पाठवावे लागत असल्यामुळे या शेतकऱ्यांनी कडकडीत उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आता विटांची बांधकामं करायला सुरुवात केली आहे. आंदोलक शेतकरी स्वत:च या घरांचं बांधकाम करत असल्यामुळे फक्त बांधकाम साहित्याचा खर्च त्यांना द्यावा लागत आहे.

सरकारसोबतच्या चर्चेच्या फेऱ्या अपयशी

केंद्र सरकारसोबत चर्चेच्या १० हून अधिक फेऱ्या झाल्यानंतर देखील अद्याप या समस्येवर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलकांचे नेते राकेश टिकैत यांनी देखील पारित झालेले कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button