TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपाटी-पुस्तकमुंबईराष्ट्रिय

आनंदवार्ता ः महाराष्ट्रातील केंद्रीय शालेय विद्यार्थ्यांना मराठीतून दिलासा, मराठीच्या अनिवार्य पेपरमध्ये गुणांऐवजी ग्रेडची सोय

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रातील केंद्रीय शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सध्या दहावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने आता दिलासा दिला आहे. त्यांना यावेळी मराठी भाषेच्या पेपरमध्ये गुणांऐवजी ग्रेड देण्यात येणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात मराठीचा पेपर सक्तीमुळे अडचणीत सापडलेल्या केंद्रीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. केंद्रीय बोर्डाच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणांऐवजी ग्रेडची सुविधा दिली जाईल. अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. नवीन मराठी अभ्यासक्रमामुळे त्यांच्या निकालावर परिणाम होऊ नये म्हणून हे केले जात आहे. मंत्री केसरकर म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता सातवी, आठवी किंवा नववीमध्ये मराठीचा अभ्यास केलेला नाही, त्यांना या पेपरमध्ये कमी गुण मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा निकाल खराब होऊ शकतो, याची जाणीव सरकारला आहे, त्यामुळे यंदाच्या दहावीच्या परीक्षेत त्यांना गुणांऐवजी ‘ए-बी-सी’ ग्रेड देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांना उत्तीर्ण होणे सोपे जाईल आणि मराठीत कमी गुण मिळाल्याने त्यांची टक्केवारी कमी होणार नाही.

शालेय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, केंद्रीय मंडळांनी तयार केलेला मराठी अभ्यासक्रम समान दर्जाचा आहे. राज्याचा शिक्षण विभाग केंद्रीय मंडळांना त्यात बदल करण्याचा किंवा सोपा करण्याचा सल्ला देऊ शकत नाही. त्यामुळे सातवी, आठवी किंवा नववीच्या वर्गात पहिल्यांदाच मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी पुढील दोन-तीन वर्षे गुणांऐवजी ग्रेड देण्याचा मानस आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button